t delightfulheart: Vikram Sarabhai

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

Vikram Sarabhai

 



 जन्म 12 ऑगस्ट 1919 (अहमदाबाद) -  मृत्यू 30 डिसेंबर 1971 (तिरुअनंतपुरम)  52 वर्षे

      अंतरिक्षात भरारी मारणारा भारत असे आपण आज म्हणतो.  क्षेपणास्त्रे आर्यभट्ट सारखे उपग्रह अंतराळात सोडू शकतो.  स्वातंत्र्योत्तर काळातील हीच स्पृहणीय प्रगती ज्या माणसाने घडवून आणली तो अवकाश युगाचा आधुनिक आर्यभट्ट म्हणजे विक्रम साराभाई विज्ञान उच्च स्तरावर नेण्याचे कार्य या महापुरुषांनी केले.

          12 ऑगस्ट 1919 साली अहमदाबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे घराणे उद्योगपतीचे होते.  स्वतः विक्रम भाईंना शास्त्र व गणित या विषयांची मूलत:च  आवड होती डॉक्टर होमी भाभांनी त्यांच्या पूर्वीच अंतराळ युगाचा वेध घेतला होता. ऍटोमीक एनर्जीचा विधायक कामासाठी कसा उपयोग करून घेता येईल यासंबंधी विक्रम साराभाईंचे सतत चिंतन चालले होते आंतरराष्ट्रीय ऍटोमिक एनर्जीच्या चौदाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते व त्याबद्दल शांतीस्वरूप भटनागर स्मृतिचिन्ह त्यांनी पटकावले.

            1962 साली त्यांनी पद्मविभूषण किताब देण्यात आला 1939 साली इंग्लंड मधील शिक्षण संपून ते भारतात परतले, त्यांनी प्रामुख्याने कॉस्मिक रेज अंतरिक्षेतून पृथ्वीकडे येणाऱ्या किरणाचे संशोधन आरंभिले व अनुशक्तीचा वापर कसा करावा याचा शोध घेतला. त्यांनी त्या विषयात पीएचडी ही पदवीही मिळवली. अहमदाबादला स्वतःची प्रयोगशाळा स्थापन केली व संशोधन सुरू केले. टोमिक  एनर्जी कमिशनचे चेअरमन पद त्यांच्याकडे चालून आले. थुंबा  ( तिरुअनंतपुरम ) येथे 1971 साली टोमिक  एनर्जी संशोधन आणि विकास केंद्र ही स्थापले.

          विमानाचे, अंतरिक्ष यानाचे उड्डाण यासाठी त्यांनी जीवाचे रान केले त्यांच्या या अविश्रांत परिश्रमाचे फळ म्हणजे आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह अंतराळात झेपावला . विज्ञानाचा उपयोग मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी करावा अशीच त्यांची अंतरीक इच्छा होती. दिनांक 30 डिसेंबर 1971 साली त्यांचे थुंबा येथे हृदयविकाराने निधन झाले.